आपण भेटायचो ती नदी
अजूनही खळाखळा वहातेय,
कारण आजही ती आतुरतेने
आपली वाट पहातेय...
रडणार कोणी असेल
तर मरणाला अर्थ आहे,
नाहीतर मरणाची कल्पना सुद्धा
वाया अन् व्यर्थ आहे.
जगावं त्या दिव्याप्रमाणं
दिव्य ज्योत घेऊन,
दुस-यांना उजेड द्यावा,
स्वतःला अंधारात ठेऊन.
देवाच्या मनात आलं आणि
त्यानं माणसाला बनवलं,
५ रुयांचा नारळ देऊन मग,
माणसानेच देवाला 'बनवलं'।
'मला विसरुन जा'
असं पत्र मला दिलंस,
पत्राच्या शेवटी मग
'तु़झीच' असं का लिहीलंस?
Saturday, August 23, 2008
Wednesday, July 9, 2008
काही चारोळ्या ...
बांधून रेशीमगाठी मनांच्या
तोच खाली पाठवतो ,
मग कितीही येवोत अडचणी
तोच दोघांना भेटवतो।
कधी कधी तिची आठवण डोळ्यात पाणी आणते
देत थोड़ा दिलासा मलाच मग म्हणते ,
तिने यावे तुझ्या जीवनात अस मलाही वाटते
म्हनुनच मी आल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी दाटते ।
मन माझ वेड
इकडे तिकडे भरकटतय,
कल्पनेतल जग
कागदावर रेखाटतय.
बांधून रेशीमगाठी मनांच्या
तोच खाली पाठवतो ,
मग कितीही येवोत अडचणी
तोच दोघांना भेटवतो।
कधी कधी तिची आठवण डोळ्यात पाणी आणते
देत थोड़ा दिलासा मलाच मग म्हणते ,
तिने यावे तुझ्या जीवनात अस मलाही वाटते
म्हनुनच मी आल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी दाटते ।
मन माझ वेड
इकडे तिकडे भरकटतय,
कल्पनेतल जग
कागदावर रेखाटतय.
Tuesday, July 8, 2008
Subscribe to:
Posts (Atom)
